Posts

समृद्धी कारखाना अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणार 'जल समृद्ध' : विहरीसाठी देणार पन्नास टक्के अर्थसहाय्य.

Image
समृद्धी कारखाना अल्पभूधारक शेतकऱ्यांना करणार 'जल समृद्ध' : विहरीसाठी देणार पन्नास टक्के अर्थसहाय्य घनसावंगी : घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेती समृद्ध करण्यासाठी समृद्धी शुगर्सचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी अल्पभूधारक ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पन्नास टक्के अर्थसहाय्य देण्यासाठी योजना सुरु केली आहे .  या योजनेतून विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाच्या योजनेतून 'सौर कृषी पंप' आणि बाराही महिने पाणी उपलब्ध राहण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' योजनेतून शेत तळ्याचा लाभ प्राधान्याने  मिळवून देणार असल्याची माहिती समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे.   ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मोफत एक क्विटल साखर योजना, शेतकऱ्यांचे  शेतरस्ते स्वखर्चातून खुले करण्याची मोहीम आणि आशा व अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या लग्नासाठी २१ हजाराची मदत या अभिनव योजनेमुळे समृद्धी कारखाना लोकप्रिय झाला. आता शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपल्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी ...

घनसावंगी मतदारसंघातील पांदन रस्त्याचे जनक;सतीशजी घाटगे पाटील..

Image
अंतरवाली सराटी ते रामगव्हाण (2 किलोमीटर) तसेच अंतरवाली सराटी कॅनल पूल ते चर्मापुरी नालेवाडी शिव पांदन रस्ता (3 किलोमीटर ) हे शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत रस्ते महत्त्वाचे होते . शेतात जाण्या येण्यासाठी, शेतमालाची ने - आन करण्यासाठी बहुतांश शेतकरी या रस्त्यावरच अवलंबून होते,तरीसुद्धा गेली कित्येक वर्षे रस्त्याचा मजबुती करण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. काही दिवसापूर्वी नालेवाडी चे सरपंच अरुण घुगे यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ' घनसावंगीतील पांदन रस्त्याचे जनक सतीशजी घाटगे पाटील साहेब ' यांच्याकडे आग्रह धरला. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम तत्पर असलेले लोकप्रिय नेतृत्व तसेच घनसावंगी विधानसभा निवडणुकीचे प्रमुख तथा समृद्धी शुगर लिमिटेड चेअरमन सतीशजी घाटगे पाटील यांनी तात्काळ या रस्त्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्द प्रमाणे मातीकाम व मुरूम मजबुतीकरण साहेबांच्या नेतृत्वाखाली, स्वखर्चातून या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.तसेच बहुतांश काम हे प्रगतीपथावर आहे. लवकरच हा रस्ता खडीकरण करून मजबूत करण...

ग्रामीण भागातील व्यासपीठ; 'पार' हद्दपार....

Image
भारतात आजही शहरी आणि ग्रामीण अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती आहेत. ग्रामीण संस्कृतीत गावचा ‘पार’ म्हणजेच सार्वजनिक ओटा किंवा मारोती मंदिरासमोरच ओटा अत्यंत महत्त्वाचा. पार म्हणजे जेथे गावकरी महत्त्वाच्या चर्चेसाठी, निर्णय घेण्यासाठी किंवा सहजच गप्पा मारण्यासाठी ज्या सार्वजनिक ओट्यावर एकत्र येतात त्याला पार असे म्हणतात. पार हे एक ग्रामीण संकृतीत माध्यम म्हणून महत्वाची भूमिका निभावते. ग्रामीण भागात लोकजागृती घडवून आणण्यासाठी पार हे माध्यम महत्त्वचे ठिकाण आहे. ग्रामीण भागात गावाच्या केंद्रस्थानी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली गोल स्वरुपात ओटा बांधला जातो. पूर्वी पारावर गावातील महत्वाचे निर्णय घेतले जात. या निर्णय प्रक्रियेत गावाचे पाटील, सरपंच तसेच गावातील सर्व नागरिक सामिल असत. गावातील लोकांचे तंटे सोडविले जात. ग्रामपंचायातही तिचे निर्णय सुनावत असे. पूर्वी पारावरच गावातील शाळाही भरत असे. गावातील विदयार्थी येथे एकत्र येऊन शिक्षण घेत. गावाच्या विकासापासून ते राजकारणापर्यंत सर्व काही चर्चा याच ठिकाणी होत. गावाचा गावगाडा याच ठिकाणाहून चालविला जात असे. ग्रामपंचायतची निर्मिती झाल्याम...

औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलणार 'G-20' म्हणजे आहे तरी काय ?

Image
G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. हा जगातला प्रमुख विकसित आणि विकसनशिल देशांचा राष्ट्रसमूह आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती. पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला.अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.. सुरुवातीला केवळ या 20 देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. मात्र 2008 च्या आर्थिक संकंटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख वर्षापासून एकदा G20 राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.. G-20 राष्ट्रगटाचे सदस्य. अर्जेंटिना,इंडोनेशिया,सौदी अरेबिया,ऑस्ट्रेलिया,भारत दक्षिण आफ्रिका,ब्राझील,इटली,तुर्की,कॅनडा,जपान, ब्रिटन,चीन,दक्षिण कोरिया,अमेरिका,फ्रांस,मेक्सिको, युरोपियन युनियन,जर्मनी,रशिया भारतासह अशा एकून 19 देशांचा समावेश यात आहे. युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे. राष्ट्रगटाचे महत्त्व. •जगातील 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये र...

यशस्वी महिला व्यावसायिक अर्चना मिश्रा..

Image
सुंदरता हा दैवी अविष्कार असतो तो सहजासहजी सगळ्यांनाच मिळत नाही याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आर्या श्री मेक ओव्हर अँड ब्युटी पार्लर च्या मालक अर्चना मिश्रा."कोण कहता है आप सुंदर नही हो कभी खुद को देखा है, आप बहुत सुंदर हो" जेव्हा त्या हे वाक्य सहज बोलून जातात तेव्हा खरंच सुंदरतेचा त्याचा अर्थ कळायला लागतो.घर संसार नातीगोती सांभाळता सांभाळता गेल्या अठरा वर्षांपासून आर्या श्री मेक ओव्हर & ब्युटी पार्लर च्या मालक अर्चना मिश्रा महिलांचे सुंदर दिसण्याचे स्वप्न साकार करत आहे. लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेला बेडरूममधील ड्रेसिंग टेबल व  जुनी विकत घेतलेली खुर्ची व आरसा एवढेच काय ते तुटपुंजा सामग्रीवर 2004 सा ली सुरू केलेला ह्या छोटा व्यवसाय आज अर्चना मिश्रा व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चार महिलांचं उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनल असून तटपूंज्या सामग्रीवर उभा राहिलेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष मध्ये रूपांतर झाल आहे. अर्चना मिश्रा यांचे बालपण व शिक्षण औरंगाबाद येथून त्यांनी पूर्ण केले.अर्चना मिश्रा यांनी विज्ञान या विषयांमध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्...

महिला हिंसाचार निर्मूलनासाठी एनजिओ चा पुढाकार महत्वाचा.

Image
महिला आणि पुरुष आजच्या युगात कुठल्याही क्षेत्रात बरोबरीने काम करत आहे.महीलांचा सन्मान करणे हि आपली संस्कृती.मागील काही घटनांमध्ये महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण वाढले हे अनेक अहवालातून समोर आले आहे.मुळात या घटना का घडतात?कशामुळे घडतात व शासनाची या संदर्भातील कायदेशीर बाजु या मुद्याचा मुळाशी जाणे हा यातील महत्वाचा भाग. * महिलांवरील हिंसाचाराची सद्यस्थिती* महिलांवरील हिंसाचार म्हणजे सामान्यतः कोणत्याही वयोगटातील कोणत्याही जातीच्या महीलावरील अपराध यात खून ,अत्याचार,विंनयभंग, बलात्कार आणि बालहत्या अशा विविध स्वरूपाचे गुन्हे यात समावेश आहे.२०१२ मध्ये भारतात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण ४% होतें म्हणजे सरासरी ३ मिनिटात एक महिला हिंसाचाराला बळी पडत आहे...असे अनेक हिंसक रूप धारण करणारी वृत्ती दिवसेदिवस व्यापक  व विस्तृत होत असताना सामाजिक प्रगल्भता स्पष्ट निर्देश होत आहे.विवाहानंतर हुंडा मागणी करणे व वराची मागणीची पूर्तता न झाल्यास वधूला शारीरिक आणि मानसिक छळले जाते यातून पुढे वैवाहिक जीवनात नैराश्य आणि पुढे मृत्यूचे टोकाचे पाऊल असे अनेक उदाहरणं आपण बघत आहोत.. * एन जी ओ चा सहभा...

प्रशासकिय व्यवस्थेत बदल घडवणारे प्रामाणिक अधिकारी श्री तुकाराम मुंढे

Image
महाराष्ट्रातील बिहार अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील 'ताडसुन्ना' या गावात ३ जुन १९७५ या दिवशी तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला.मुंढे आईच्या पोटात असताना वडील निवर्तले पुढे आईने संगोपन करत शिक्षण व चांगले संस्कार देऊन आज एका प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे साहेबाना घडवलं.आर्थिक बेताची परिस्थितीत जीवनाची वाटचाल करताना अनेक अडथळे वाटसर करताना मनात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण करणं हे फार गरजेचं असतं अशा परिस्थितीला बुद्धिमत्तेची जोड दिल्यास चित्र पालटु शकते हा स्वतः मधील विश्वास त्यांना मोठे व्यासपीठ  उपलब्ध करून देतात यात तिळमात्र शंका नाही. एमपीएससी परीक्षेत वित्त विभागात नौकरी मिळाली परंतु ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने जळगावमध्ये व्याख्याते म्हणून २ महिने काम केले नंतर २००५ ला 'यशदा' पुणे येथे प्रशिक्षण काळात यूपीएससी परीक्षेत देशातून २० वा रँक मिळवून आयएएस म्हणून प्रशासनात सोलापूर मधील धरणी येथे प्रकल्प अधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली. पुढे नांदेड येथे उपजिल्हाधिकारी तसेच २००८ साली नागपुर जिल्हा परिषद मुख्य कार्...